97632 06212 pwatsaru@yahoo.com

उनाची आग पोहचली उडपीत


गुजरातमधील एका दलित कुटुंबातील तरुणांना गोरक्षकांनी दिवसाढवळ्या राजरोस केलेल्या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या दलित आंदोलनाने देशभरातील दलितांना संघर्षाची प्रेरणा मिळालेली आहे. खरं तर असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. गोहत्या केल्याच्या संशयावरून दलितविरोधी अत्याचाराचे प्रकरण याआधीही झाले आहे आणि ते अधिक भयानक होते. 15 ऑक्टोबर 2002 या दसर्याच्या दिवशी हरयाणातील झज्जरजवळ हिंदुत्ववादी गुंडांनी कातडे वाहून नेणार्या पाच दलितांना ठार मारले होते. दुलीना पोलीसचौकीपासून अगदी जवळ झालेल्या या हत्येने क्रौर्याच्या सर्व परिसीमा ओलांडल्या होत्या. त्या पाचजणांचे डोळे बाहेर काढण्यात आले. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले आणि तिथेच त्यांना जाळूनही टाकण्यात आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe