97632 06212 pwatsaru@yahoo.com

अक्कलशून्य आणि जनविरोधी निर्णय


8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनवरून केलेल्या भाषणात त्याच रात्रीच्या बारा वाजल्यापासून म्हणजे केवळ चार साडेचार तासांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या वैध चलन म्हणून संपुष्टात येतील अशी घोषणा केली. आपल्या या अत्यंत विलक्षण खेळीच्या समर्थनार्थ त्यांनी आपण देशातला काळा पैसा संपवू पाहत आहोत असे विधान केले. त्याचबरोबर आणखी एक तर्कदेखील त्यांनी मांडला. दहशतवादी मोठ्या प्रमाणावर नकली नोटा वापरत असल्यामुळे या निर्णयाने त्यांच्या सगळ्या दुष्ट कारवाया संपुष्टात येतील. मोदी सरकारच्या अतिउत्साही समर्थकांनी तर मोदींनी दहशतवादाविरुद्ध आणखी एक लक्ष्यभेदी हल्ला (साध्या भाषेत सर्जिकल स्ट्राईक्स!) चढवल्याचे घोषित करून टाकले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe