97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा मोर्चे ः काही प्रश्न (उत्तरार्ध)


गेल्या 25 वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या अर्थकारणाच्या आणि त्या अनुषंगाने समाजकारणाच्या शक्यता मुक्त झाल्या आहेत, उपलब्ध झाल्या आहेत, त्यांची गती तुम्ही कमी करू शकता, पण त्यांना तुम्ही रोखून उलटे फिरवू शकत नाही. भांडवली अर्थकारणाच्या परिणामस्वरूपी समष्टीपासून व्यक्तीचं व्यक्ती म्हणून जे घडणं आहे आणि त्यात आपली स्वतंत्र व स्वायत्त जाणीव असणं (स्त्री-पुरुष दोघांच्याही बाबतीत) जे आहे, ते रोखताही येत नाही आणि टाळताही येत नाही आणि त्याची गती कमी करणे हे जबर हिंसेद्वारेच होऊ शकते. त्यामुळे आज जरी हे मोर्चे हिंसाचार करत नसले, तरी हिंसाचाराच्या सर्व शक्यता यामध्ये अनुस्यूत आहेत. हे अगदी जर्मनीतील पेगिडासारखं आहे. ते कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नाही हे आवर्जून आणि ठासून सांगतात. पण विशिष्ट प्रकारच्या समाजसमूहांबद्दलचा आकस आणि संकुचित दृष्टिकोन बाळगला तर यथावकाश, विशेषतः आणि शासनाने तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर, ते तुम्हाला जबरी हिंसेकडेच घेऊन जाणार आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe