97632 06212 pwatsaru@yahoo.com

चित्रमय भारत


दुसर्या जागतिक महायुद्धानंतर जगातल्या सर्वच राष्ट्रांनी आपापली प्रगती केली. राष्ट्राची गतीने सुधारणा होण्यासाठी औद्योगिकीकरण महत्त्वाचे होते. औद्योगिकीकरण सर्वच बाजूंनी होत असल्याने कला आणि संस्कृतीवरही त्याचा परिणाम झाला. झपाट्याने वाढणार्या तंत्रज्ञानातून मानवनिर्मित वस्तूंना नवनवे पर्याय मिळत होते. हस्तकौशल्यातून तंत्रकौशल्याकडे अशी निर्मितीप्रक्रियाच बदलली. हस्तकौशल्यातून आलेली निर्मिती परंपरा तंत्रकौशल्यात बदलल्याने राष्ट्राराष्ट्रांची कारागरीतून निर्माण होणारी ओळख संपून सर्वच राष्ट्रातल्या वस्तू समान होऊन कारागिरीचे असे सपाटीकरण होऊन क्षीण झाली. कारागिरी ही कलेची प्राथमिक गरजच असते. कारागिरीबरोबर जगातील कलाही आपली स्वतःची सांस्कृतिक ओळख सोडून तंत्रकौशल्याच्या प्रभावाने वस्तुनिर्मितीसारखी समान होत राहिली. आपापल्या परंपरेपासून तुटलेल्या अशा कला ‘आधुनिक’ म्हणून प्रस्थापित होत राहिल्या.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe