97632 06212 pwatsaru@yahoo.com

हे तर शेटजी-भटजींचे आधुनिक दासच!


भारतातील अनेक प्रांतांत तेथील प्रमुख जातींचा प्रभाव सत्तेच्या राजकारणात पडलेला आढळतो. एम. एन. श्रीनिवास यांच्यासारख्या विचारवंतांनी ‘प्रभावी जाती’चा (डॉमिनन्ट कास्ट) सिद्धान्तच मांडला आहे : ‘प्रभावी जात ही केवळ आर्थिक आणि राजकीय वर्चस्वाने ढवळाढवळ करते असे नसून खेड्यात अगर स्थानिक पातळीवर संख्येच्या दृष्टीने ती बलवत्तर असते.’ या सिद्धान्ताची मांडणी त्यांनी अन्य प्रांतातील परिस्थितीच्या अवलोकनाने केलेली दिसते. महाराष्ट्राचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ब्राह्मण, मराठे व महार या महाराष्ट्रातील प्रभावी जाती. संख्येच्या बाबतीत ब्राह्मण, महार-मराठ्यांची कधीच बरोबरी करू शकणार नाहीत. महारांचा प्रभाव स्थानिक पातळीवर संख्या असूनही पडणे शक्य नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती अगदी विशिष्ट आहे, असे मी एवढ्याचसाठी म्हणतो. या परिस्थितीचा फायदा महाराष्ट्रातील मराठा जातीचे नेतृत्व बुद्धिपुरस्सररीत्या घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘प्रौढ मतदान पद्धतीने एकदा संसदीय राज्यव्यवस्था प्रस्थापित झाली की मानवांच्या हालअपेष्टा संपतील असा इतिहासाचा निर्वाळा नाही. जर एका जातीचे वर्चस्व मानणार्या मातब्बर वर्गाच्या हातांत राष्ट्रीय सरकार पडले तर शिक्षण व सुबत्तेची दारे त्याच वर्गाला खुली होतील, आणि इतर जातीतील लोकांचे जिणे दास्यातच जाईल. आणि ही परिस्थिती आहे या सत्तेपेक्षा (ब्रिटिश) वेगळी असणार नाही.’ (डॉ. आंबेडकर : लाइफ अॅन्ड मिशन, धनंजय कीर, पान 363). ही जाणीव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही डॉक्टरसाहेबांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe