97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुस्लीम महिला आणि परिवर्तनाची ऐतिहासिक मागणी


तीन वेळा तोंडी तलाकचा मुद्दा पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेमध्ये आहे, पण यावेळी ह्या चर्चेला कारण म्हणजे कोणता फतवा अथवा निर्णय नसून, मुस्लीम महिलांनी हा विषय उचलून धरला तसेच सर्वोच्च न्यायालय पातळीवरच्या चर्चेनेदेखील या विषयाला पुन्हा एकदा हवा दिली. या वादामुळे सप्टेंबर महिन्यात दोन विलक्षण घटना घडल्या. आंध्रप्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अबीद रसूल खान यांनी एक महत्वाची घोषणा केली. त्यांनी अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा संघाला एक जाहीर पत्र पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी या संघटनेला भारतीय सुन्नी मुस्लीमांमध्ये सर्रास वापरात असलेल्या तोंडी तलाक पद्धतीला विरोध करण्याचे आवाहन केले. या पद्धतीनुसार, मुस्लीम पती त्याच्या पत्नीला तिच्या गैरहजेरीतदेखील घटस्फोट देऊ शकतो. त्याचप्रमाणे तीन वेळा तोंडी तलाकचा उच्चारदेखील घटस्फोट देण्यास पुरेसा ठरतो. या पद्धतीला आयोगाने वेळीच विरोध करावा अथवा मुस्लीम वैयक्तिक कायद्याच्या होणारया पतनासाठी तयार राहावे, असे खान यांनी या पत्रात म्हटले आहे. या पद्धतीला पाठिंबा देणे म्हणजे, समान नागरी कायद्यासाठीचा मार्ग आणखी सोपा करणे आहे, असे मतदेखील खान यांनी मांडले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe