97632 06212 pwatsaru@yahoo.com

जयललितांचा वारसा


कल्याणकारी अर्थकारणाकडून विकासकेंद्री बाजाराधिष्ठित, नवउदारमतवादी धोरणांकडे झालेल्या निर्णायक बदलाच्या काळात जयललिता यांनी मात्र या दोहोंना एकत्रितपणे पुढे नेता येत असल्याची शक्यता वास्तवात उतरवून दाखवली. जुलै 1991 मध्ये त्या तमिळनाडूच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. जवळपास त्याच वेळी पी. व्ही. नरसिंहराव सरकारने नेहरूवादी तत्त्व आणि धोरणांपासून औपचारिक असे वळण घेत आर्थिक उदारीकरणाची धोरणे अंगिकारली होती. परिणामी अट म्हणून संरचनात्मक समायोजनाचा दट्ट्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून लावला जात असताना अन्य राज्यसंस्थांवर झाला इतका परिणाम जयललिता यांनी आपल्यावर होऊ दिला नाही. त्यावेळी काँग्रेसबरोबर युती असलेल्या त्यांच्या पक्षाने, अण्णाद्रमुकने उदारीकरणाच्या धोरणावर टीका केली नाही पण, त्या या धोरणबदलाच्या कौतुकब्रिगेडमध्येही सामील झाल्या नाहीत. त्याऐवजी, शाळेतील मुलांसाठीच्या मध्यान्हभोजन योजनेबाबत त्या नुसत्या ठामच राहिल्या असे नाही तर त्यांनी त्या योजनेचा अधिक विस्तारदेखील केला. तसेच त्यांच्या सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विस्तार करत सवलतीवर देण्यात येणार्या चीजवस्तूंमध्ये वाढही केली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe