97632 06212 pwatsaru@yahoo.com

धार्मिक स्वातंत्र्य आणि खानपान व्यवहार


गेल्या दोन वर्षांत गो-रक्षा, गो-रक्षक, गोमांस हे शब्द कानावरून न गेलेली व्यक्ती सापडणं विरळाच. बहुसंख्य हिंदूंसाठी गाय ही पवित्र प्राणी आहे. तर हे पावित्र्य राखण्याची, जपण्याची राज्यसंस्थेची संस्थात्मक जबाबदारी आणि त्या योगाने घडत जाणारी भूमिका हे सद्यकालीन राजकीय तसेच लोकशाही प्रक्रियेचे कळीचे मुद्दे म्हणून पाहावे लागतील. विशिष्ट जागा, पद्धती, आचार, प्राणी यांना चिकटलेल्या पावित्र्याच्या समजुती या स्थळ-काळपरत्वे बदलताना दिसून येतात. धार्मिक पावित्र्य ही सर्वसाधारणपणे अशी कल्पना आहे की जी इतर सर्व आचरण, कर्तव्यांपासून वेगळी, आणि द्वैत संबंधांमध्ये आकार घेते. तसंच या संकल्पनांशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्याची मुभा ही क्वचितच असते. पवित्र-अपवित्र हे द्वैत आधुनिक विचाराच्या इतर द्वैतांबरोबर स्वतःचे अस्तित्व निरनिराळ्या व बदलत्या स्वरुपासोबत कायम होताना दिसते आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास धर्माच्या विशिष्ट तत्त्वांना केंद्रीभूत ठेवून इतर जगण्याच्या व्यवहारापासून वेगळी अशी उच्चतम, नैतिक धारणा म्हणजे पावित्र्य. अशा धारणांमधून वेगवेगळ्या जागा, प्राणी, धर्मग्रंथ, पद्धती या पवित्र मानल्या जातात, ज्या कोणत्याही चिकित्सेचा विषय सहसा असत नाहीत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe