97632 06212 pwatsaru@yahoo.com

आदिवासी विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण : समावेशनाकडून वर्जिततेकडे


सामाजिक वर्जितता व समावेशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्ती किंवा समूहांना समाजात उद्भवलेल्या ज्या परिस्थितीमुळे वर्जिततेला सामोरे जावे लागते त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी निश्चित अशी धोरणे, योजना व कृती कार्यक्रम आखून न्याय्य वाटपाद्वारे समावेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. समूह किंवा व्यक्तीची असणारी श्रमबाजारातील ओळख, विशिष्ट जातसमूहाचे प्रतिनिधित्व या प्रातिनिधिक बाबी वर्जिततेला कारणीभूत ठरतात. वर्जितेची एक निश्चित अशी कारणमीमांसा नसून, सामूहिक स्वरूपाच्या सहसंबंधांमुळेे समूहामध्ये पुरेशा सहभागाचा अभाव, सामाजिक एकात्मता व सत्तासंबंधात अल्प उत्पन्न, दारिद्र्य व निकृष्ट जीवनमानाचा दर्जा हे अनेकदा वर्जिततेला जबाबदार ठरते. व्यक्ती वा समूहाला अनुभवी लागणारी वर्जितता परिस्थितीजन्य असू शकते अथवा कायमस्वरूपी असू शकते. वर्जिततेच्या स्थितीवर मात करण्यासाठी जबाबदार असणार्या घटकांपैकी शिक्षण या घटकाला केंद्रस्थ मानून आदिवासींच्या संदर्भामध्ये प्रस्तूत लेखाची मांडणी केली आहे. वैयक्तिक व सामूहिक जीवनामध्ये बदल घडविण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे. शिक्षणाचा समावेश समवर्ती सूचीत केला असला तरी आदिवासींना शिक्षणाच्या संधी अजूनही पूर्णपणे सहज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. आदिवासीबहुल प्रांतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचे समावेशन साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षणाद्वारे होणार्या समावेशनात पालक, कर्ता, शिक्षक व शालेय पाठ्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe