भाषा ही एक अखंड प्रवाही घटना आहे. म्हणजे एक भाषा अनेक कालातून, कालपरत्वे विविध राजकीय, आर्थिक, सामाजिक व भौगोलिक पर्यावरणातून संक्रमित होत वाहत असते. मूळ साचा अबाधित ठेवून आधी उल्लेखिलेल्या सर्व घटकांनी प्रभावित होत तत्कालीन स्वरूप प्राप्त करून घेत असते. त्यामुळे एक प्रमुख भाषा आणि तिच्या प्रभावातून तयार झालेल्या उप किंवा बोली भाषा असे काही म्हणणे हे पूर्णतः अवैज्ञानिक आहे.